सायरा बानू यांची संपूर्ण माहिती Saira Banu Information In Marathi

Saira Banu Information In Marathi सायरा बानू यांनी आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं लाखो तरुणांना घायाळ केलं आणि त्यांच्या मनात असणारी चुलबुली अभिनेत्री बनल्या. सायरा बानू यांचं नाव जरी काढलं तरी अजाणतेपणे त्यांची आणि दिलिप कुमार यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सर्वांमध्ये सुरू होतात.  बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री सायरा बानो ही 60 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे. तर चला मग त्यांच्याविषयी माहिती पाहूया.

Saira Banu Information In Marathi

सायरा बानू यांची संपूर्ण माहिती Saira Banu Information In Marathi

जन्म :

सायरा बानो यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 मध्ये मसूरी येथे झाला. सायरा बानू यांच्या आईचे नाव नसीम बानू आहे. नसीम ह्या एक अभिनेत्री होत्या.

शिक्षण व बालपण :

सायरा बानो यांचे बालपण लंडनमध्ये गेले.  तिचे सर्व शिक्षण लंडनमध्ये झाले होते, पण जेव्हा ती भारतात आली तेव्हा तिने अभिनय विश्वात प्रवेश केला. अभिनयासाठी त्याला अनेक पदकेही मिळाली आहेत.  गोपी सगीना बैराग शागीर्द दिवाना आणि चैताली सारखे हिट चित्रपट देणाऱ्या सायरा ने तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण केले.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात अनेक चढउतार आल्यानंतरही तिने आपल्या बालपणीची दोन स्वप्ने पूर्ण केली.  ती म्हणजे तिला तिच्या आईसारख सुंदर आणि क्युट दिसायचं होतं आणि दुसरी म्हणजे दिलीप कुमार यांच्याशी लग्न करायचं होतं.

बालपणीची इच्छा व प्रेम :

अभिनेता दिलीप कुमार सायरा बानुला खूप आवडत होता. ती लहानपणापासूनच त्याची चाहती होती. तिला श्रीमती दिलीप कुमार व्हायचे होते. तिच्या आईने सायराला समजावून सांगितले, जो अभिनेता राजेंद्र कुमारच्या प्रेमात होता, तीन मुलांचे वडील, पण ती काही समजून घ्यायला तयार नव्हती. मग नसीमला वाटले की, सायरा दिलीप कुमारशी सहमत असेल.

यानंतर, नसीमच्या सांगण्यावरून, अभिनेता दिलीप कुमारने तिला समजावून सांगितले की, ती राजेंद्र कुमारसोबत आयुष्यभर फक्त सौतन म्हणून जगेल. यावर सायराने दिलीप कुमार यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. येथूनच तिची ही लहानपणीची इच्छा देखील पूर्ण होण्याच्या मार्गावर गेली, परंतु अनेक त्रासानंतरही ती एके दिवशी श्रीमती दिलीप कुमार बनली. 22 वर्षांत, सायराने 1966 मध्ये दिलीप कुमारशी लग्न केले.

चित्रपट प्रवेश :

सायरा बानूने आपल्या आयुष्यात स्वतःचे स्थान निर्माण केले. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात आपल्या वेगळ्या अदाकारीने नवीन ओळख निर्माण केली. सायरा बानू यांनी वयाच्या सतराव्या वर्षी हिंदी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. 1961 मधील ‘जंगली’ या पहिल्याच चित्रपटाने त्यांना फिल्मफेअर अवॉर्डचे नामांकन मिळवून दिले.

शम्मी कपूर यांच्यासोबत कारकीर्दीला प्रारंभ झाला, तोच मुळी या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाने. त्यानंतर त्यांनी अभिनय केलेले अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आणि अजून तीन फिल्मफेअर नामांकने त्यांना लाभली. 1960 ते 1970 च्या दशकातील एक रोमँटिक प्रेमकथांची यशस्वी सिनेअभिनेत्री म्हणून त्यांची कारर्कीर्द रसिकांच्या विशेष स्मरणात राहिली.

राजेंद्र कुमार यांच्यासोबतच्या झुक गया आसमान, आयी मिलन की बेला आणि जॉय मुखर्जी यांच्यासोबतच्या आओ प्यार करे, दूर की आवाज, शागीर्द आदी चित्रपटांनी त्यांना लोकप्रियता आणि यशाच्या शिखराकडे नेले. मात्र, त्यांना पहिल्या रांगेत अव्वलस्थानी आणून बसवले. ते पडोसन या चित्रपटाने सुनील दत्त यांच्यासोबत त्यांनी केलेला हा चित्रपट क्लासिक गणला जातो.

त्या चित्रपटाने त्यांच्या करिअरला निराळे वळण दिले. त्याच सुमारास त्यांचा विवाह त्या काळचे सुपरस्टार दिलीपकुमार यांच्याशी झाला होता. त्यांच्यासोबतही त्यांनी चित्रपट केले आणि त्या काळातील जवळपास सर्व आघाडीच्या अभिनेत्यांच्या त्या नायिका बनल्या. त्यांची चित्रपट बऱ्याच प्रमाणात गाजले. कोणत्या एक प्रसिद्ध नाईका बनल्या.

चित्रपटांची नावे :

विश्वजीत यांच्यासोबतचा एप्रिल फूल, नवीन निश्चल यांच्यासोबतचा व्हिक्टोरिया नंबर 203 आणि पैसे की गुडिया, दिलीपकुमार यांच्यासोबत सगीना, बैराग, गोपी, धर्मेंद्र यांच्यासोबत ज्वार भाटा, इंटरनॅशनल क्रुक, चैताली, आदमी और इन्सान, पाकीटमार, इ. चित्रपट कमी-अधिक प्रमाणात गाजले. मनोजकुमार यांच्या पूरब और पश्चिममधील त्यांची भूमिका त्यांच्या प्रतिमेला आव्हान देणारी होती.

सायरा बानू यांनी देवआनंद, विनोद खन्ना यांच्यासोबत ही त्यांनी काम केले आहे. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत काम करण्याचे मात्र राहून गेले आणि त्याबद्दल त्यांना खंतही वाटते. मात्र, या चित्रपटांतून त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिकांमुळे त्यांची अष्टपैलू अभिनेत्री म्हणूनही ओळख पक्की झाली. एका टप्प्यावर त्यांनी आपल्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला.

पडद्यावरच्या छबीचे आयुष्य किती, याचे भान त्यांना वेळीच आले. त्यामुळे, त्यांनी आपली जुनी प्रतिमा रसिकांच्या मनात कायम ठेवण्यासाठी पुनरागमनाचा मोह टाळला. आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या दिलीपकुमार यांच्याशी लग्न करून त्यांनी या ट्रॅजेडी किंगचा एकटेपणा दूर केलाच, शिवाय विवाह आणि सहजीवनाचा एक आदर्श घालून दिला.

विवाह :

सायरा बानो यांनी 1966 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले. ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. तर सायरा 22 वर्षांच्या होत्या. काळानुसार दोघांचे प्रेम अधिकाधिक घट्ट होत गेले. या दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांचीही जोडीवरुन नजर हटत नसे. चाहत्यांची फेव्हरेट जोडी बनली होती. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरीही इंटरेस्टींग होती. इतकेच काय तर या दोघांच्या नात्यातही चढउतार आले.

सायरा बानो आणि दिलीप कुमार यांना कधीही मुल झालं नाही. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना मूलबाळ नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. पण फार कमी लोकांना त्यामागचे कारण माहिती आहे.याबाबत दिलीप कुमार यांनी आपली ऑटोबायोग्राफी द सबस्टांस अॅन्ड द शॅडो यामध्ये लिहीलं आहे.

1972 मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा सायरा गरोदर होत्या. त्यावेळी आठव्या महिन्यामध्ये सायरा यांना ब्लडप्रेशरचा त्रास होऊ लागला. त्यावेळी गर्भाची वाढ जवळपास पूर्ण झाली होती. त्यावेळी बाळाला वाचवण्यासाठी सर्जरी करणं शक्य नव्हतं. अशा क्रिटीकल परिस्थितीमध्ये श्वास कोंडून बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर सायरा कधीही आई होऊ शकल्या नाही.

दिलीप कुमार यांचे दुसरा विवाह :

1980 मध्ये दिलीप कुमार यांनी दुसरं लग्न केलं. तेव्हा अशा चर्चांनी जोर धरला होता की, सायरा आई होऊ शकत नाही, म्हणून बाळासाठी दिलीप कुमार यांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. लोकांच्या प्रश्नांना घाबरून दिलीप कुमार यांनी घराबाहेर निघणेही बंद केले होते.

दिलीप कुमार यांच्या दुसऱ्या लग्नामुळे सायरा पुरत्या खचल्या होत्या. असं म्हटलं जातं की, दिलीप यांनी असमासोबत मुलासाठी दुसरं लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 1983 मध्ये असा आणि दिलीप कुमार यांच्यामध्ये घटस्फोट झाला.

पुरस्कार :

  • सायरा बानू यांना त्यांच्या अनेक दशकांच्या भरीव योगदानाचा उचित सन्मान महाराष्ट्र सरकारच्या राजकपूर जीवनगौरव पुरस्काराने झाला आहे.
  • जंगली या पहिल्याच चित्रपटाने त्यांना फिल्मफेअर अवॉर्डचे नामांकन मिळवून दिले.
  • दिवाणामधील अभिनयासाठी पुन्हा नामांकन मिळाले.

ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-