दादोजी कोंडदेव विषयी संपूर्ण माहिती Dadoji Konddeo Information In Marathi

Dadoji Konddeo Information In Marathi दादोजी कोंडदेव शहाजीराजे भोसले यांचे चाकर होते. शहाजीराजे भोसले यांच्याकडे नेमके काम केव्हापासून सुरू केले. येथे उल्लेख आढळत नाही. मात्र शहाजी भोसले यांचे चाकर होते. तसेच ते आदिलशाहीच्या प्रशासन व्यवस्थेतील एक आदिलशहाने नेमलेले व नंतर सुभेदार झालेले एक हवालदार होते. असा विद्वानांना मान्य नसलेला नवीनतम प्रतिवाद आहे.

Dadoji Konddeo Information In Marathi

दादोजी कोंडदेव विषयी संपूर्ण माहिती Dadoji Konddeo Information In Marathi

जन्म :

छत्रपती शिवाजी महाराजांचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक दादोजी कोंडदेव हेआहेत. त्यांचा जन्म 1577 मध्ये झाला. ते वयाच्या 73 वर्ष पर्यंत जगले. त्यांचा मृत्यू होईपर्यंत म्हणजेच 1636 पासून ते मृत्यू पावे पर्यंत ते शिवाजी राजांकडे होते. त्याआधी त्यांनी पुणे परगणा व त्यांचाही जहागिरीची देखरेख करणारे सुभेदार पद घेऊन चाकरी केली होती. दादोजींचा मृत्यू झाला, तेव्हा शिवाजीराजे केवळ 19 वर्षाचे होते.

इतिहासकार यदुनाथ सरकार आणि अन्य परंपरागत इतिहासकारांनी स्वीकारलेल्या मतानुसार, दादोबा कोंडदेव हे महाराष्ट्रातील दौंड भागातील महाराष्ट्रीय देवस्थान ब्राह्मण कुटुंबातील आणि मौजे माळठाण तालुका शिरूर येथील होते.

त्यांचे मूळ आडनाव गोचिवडे असे होते. परगण्यातील कुलकर्णी होते आणि भोसले कुटुंबांची संबंध फार वर्षापूर्वी पासून होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी या गावचा कुलकर्णी हे काम पाहत होते. आदिलशाही मार्फत ते सिंहगडचे किल्लेदारही होते.

सुभेदारी ची कारकीर्द :

शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने अहमदनगर वर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी एक सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली.

चाकणपासून शिरवळ इंदापूर सुपे इथपर्यंतचा पुणे परगण्याचा मुलुख उत्तरेस घोड नदी पूर्वेस भीमा दक्षिणेस असलेल्या प्रदेशाकडून जहागीर म्हणून मिळाला होता. प्रत्यक्ष शहाजीराजांना कर्नाटकात बंगलोर येथे काळ व्यतीत करावा लागल्यामुळे त्यांना स्वतः जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी वेळ मिळत नव्हता, म्हणून त्यांनी जहागिरीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांकडे सुभेदार म्हणून सोपवली.

सुभेदार या नात्याने पुणे परगणा परिसरातील दादोजीने दक्ष कारभाराने परिस्थितीत अमुलाग्र सुधारणा घडवून आणली. लोकांना सुरक्षित वाटण्यासाठी योग्य ते उपाय केले, निवाडे दिले, जमिनीचे मालकी हक्क निश्चित केले, जमिनीची प्रतवारी लागून मलिक अंबरची जमीन महसूल पद्धती आवश्यक त्या फेर बदलाने सर्व जहागिरीत लागू केली. त्यांच्या उत्पन्नावर सारा निश्चित केला आणि शेती बागायतीला उत्तेजन दिले. गाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आणि शेती व्यवसायात सुधारणा व्हावी म्हणून काही वर्ष शेतसारा सुद्धा माफ केला.

छत्रपती शिवाजी राजेचे गुरु :

बखरीमध्ये उल्लेख असला तरी अन्य प्रमाणे ऐतिहासिक साधनांच्या संदर्भाने दादोजी कोंडदेव हे नेमून दिलेले काम करणारे केवळ एक सुभेदार होते. असे काहीजण समजतात व खऱ्या इतिहासाची प्रमाण साधने मानले जात नाहीत. परंतु दुसरे काय आहे हे ही कागदपत्रे मिळत नसताना बखरिचा इतिहास लिहिण्यास याचा अवश्य उपयोग होतो.

शिवछत्रपतींची एक्याण्णव कलमी बखर त्यानुसार श्रीमंत महाराज भोसले, शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था लावणारा या दृष्टीने शिक्षक म्हणून मानाने केलेल्या त्यांच्या उल्लेखाचा आधार घेऊन, छत्रपती शिवाजीराजा विषयक ऐतिहासिक संशोधन आणि तदनंतर चे ललित लेखन यामुळे शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी कोंडदेव यांनी केलेल्या कारभारातून शिवाजीराजेंना मार्गदर्शन लाभले असावे असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आणि बरेच काळ शालेय इतिहासातून व्यक्त केला गेला.

शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करणारे असल्याने त्यांना शिवाजीराजांचे गुरू म्हणतात. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा कोणतेही अधिकृत जबाबदारी किंवा तसा कागदोपत्री पुरावा नसताना, छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने मोठे झाले असा समज पसरणे, ही विशिष्ट संभाजी ब्रिगेड या घटनेच्या नेत्यांची इतिहासाविषयीची दिशाभूल आहे.

अशी दिशाभूल दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते व इतिहास लेखन करणारी मंडळी ब्राह्मण असल्यामुळे केली जात होती, असे ब्राह्मणेतर चळवळ आणि संभाजी ब्रिगेड इत्यादी संस्थानांनी दादोजी कोंडदेव हे गुरू असल्याचा उल्लेख यापुढे वगळावेत असा आग्रह धरल्याचे दिसून येते.

नवीन बदलानुसार दादोजी गोचिवडे आणि दादोजी कोंडदेव या दोन स्वतंत्र व्यक्ती होत्या. दादोजी कोंडदेव हे मराठ्यांचे नव्हते तर शिवथरची होते. दादोजी कोंडदेव विजापूरच्या आदिलशहाकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करत होते. इ.स. 1630 मध्ये त्यांची हवालदार पर्यंतची बढती झालेली होती.

इ.स. 1630 मध्ये विजापूरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवाकडे जाते. 1632 ते 1636 अखेर शहाजीराजे हे निजाम शहाचे पूर्ण हत्यार होते. त्यामुळे परिणाम तर दादोजी कोंडदेव शहाजीराजांचे चाकर होते.

दादोजी कोंडदेवांच्या उपस्थितीत गोत सहादुल पुणे वर्तनातील तंट्याची निवड करताना , तसेच उजाड मुलुक लागवडीखाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रांतून तसेच बखरीतून आढळतात निवाडा देताना ते निष्पक्ष आणि न्यायी होते जरब बसवताना त्यांनी कुलकर्णी ला मृत्यूदंडही दिल्याचा त्यांचा उल्लेख आहे.

दादोजी कोंडदेव यांचा निजामशाही बुडविण्याताना, शहाजानने दौलताबाद जिंकण्यासाठी त्याने आपला सरदार खान यांच्याकडे सर्व अधिकार सोपविले होते. महाबतखानचा मुलगा खान जमान हा देखील या स्वारीत होताच. विजापूरचा आदिलशहा तोपर्यंत निजामशाही विरुद्ध मुघलांना मदत करीत होता. पण न जाणो उद्या हेच मुघल आपणाला देखील बुडवतील या जाणिवेने आदिलशहाने आता मोगलांच्या विरुद्ध निजामशाहीला मदत दिली आणि शहाजी राजांनी मोगलकी सोडली व निजामशाही प्रवेश केला.

शहाजीराजांची निजामशहाला गरज होती. तेव्हा एकदा सोडून गेलेला सरदार पुन्हा परत आला तर शिक्षा न करता निमुटपणे प्रत्येक बादशहा त्याला पदवी देत असे. महाबतखानाने दौलताबादला वेढा दिला. शहाजीराजांनी आदिलशाहीच्या सर्व सरदारांनी दौलताबाद लढविण्याची शिकस्त केली.

पण अखेर दौलताबाद पडले. खुद्द निजाम हुसेन शहा व त्यांचा वजीर फत्तेखान हे महाबतखानच्या हाती लागले. निजामशाही बुडाली असे महाबतखान आवश्य वाटले. शहाजीराजांनी एक जबरदस्त विचार केला त्यांनी मुरार जगदेव या विजापुरच्या सरदाराला म्हटले.

“निजामशाहीची दौलत ही एक राजधानी गेली म्हणून काय झाले, आपण दुसरी वसाहत उभी करू, राजधानी बनवू”. तुम्ही मला मदत करा आणि मोगल हाकलून काढू यात शहाजी राजांचा केवढा तरी मोठा डाव होता. एका बादशहाचे बाहुले हाती धरून सत्ता आपल्या हाती घेण्याचा हा महत्त्वकांक्षी डाव त्यांनी मांडला होता. सत्ता काबीज करणे शहाजीराजांचा अनेक दिवसाचा प्रयत्न हा असाच चालू होता.

शहाजीराजांची राजकीय कामगिरी व त्यांची योग्यता फार मोठी होती. त्यांना यात अखेर यश आले विजापूरच्या आदिलशहाने राजांना निजामशाही पुन्हा उभी करण्याकरता मदत करण्याचे कबूल केले व मुरार जगदेव प्रत्यक्ष शहाजीराजांच्या पाठीशी उभी राहिले.

“तुम्हाला आमची माहिती दादोबा कोंडदेव यांच्याविषयी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे सुद्धा अवश्य वाचा :-


दादाजी कोंडदेव कोंढाण्याचे सुभेदार होते का?

त्यांनी जहागिरीची व्यवस्था पहाण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांकडे सुभेदार म्हणून सोपविली.


शिवाजीचे दादाजी कोण होते?

शिवरायांचे गुरु दादाजी कोंडा-देव होते. शिवाजी पुण्यात त्याच्या आई आणि शिक्षकांच्या कडक देखरेखीखाली वाढला. दादाजी कोंडा-देव यांनी शिवाजीला प्रशासक आणि तज्ञ सैनिक बनवले.


दादाजी कोंडदेव यांनी शेतकर्‍यांना जमीन करात सवलत का दिली?

दादाजी कोंडदेव यांनी शेतकर्‍यांना जमीन करात सवलत दिली जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीची मशागत करण्यास प्रोत्साहन मिळावे .

1 thought on “दादोजी कोंडदेव विषयी संपूर्ण माहिती Dadoji Konddeo Information In Marathi”

  1. दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी यांचे मार्गदर्शक तसेच शिक्षक म्हणजेच गुरु होते हे अनेक महान तज्ञांनी आपले विचार निस्वार्थीपणे व्यक्त केले आहे. आणि ते पटतातही.‌ अलिकडेच कांहीं स्वार्थी सत्तापिपासू ब्राह्मण द्वेषी दुष्ट राजकारणी लोकांनी सत्तेच्या जोरावर खर्या परिस्थितीचं विद्रोही वृत्तीने इतिहासाचं वाईट हेतूने प्रेरित होउन खंडन केले आहे. ब्राह्मण दोष यांच्या नसानसात भिनलेला आहे.‌ हे अतिशय निंदनीय आहे एवढंच अभ्यासल्यानंतर कळते आहे.

Leave a Comment