वीर जिवाजी माहाले विषयी संपूर्ण माहिती Veer Jivaji Mahale Information In Marathi

Veer Jivaji Mahale Information In Marathi वीर जिवाजी माहाले यांची यशोगाथा आजही अजरामर आहे. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन, लाखोंचा पोशिंदा छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठी दरवर्षी विविध ठिकाणी जीवा महाले यांची जयंती साजरी केली जाते. शूरवीर जीवा माहाले यांच्यासह त्यांच्या घराण्यातील शूर वीरांचा इतिहास त्यांच्यामुळे प्रकाशित झालेला आहे. होता जिवा म्हणून वाचला शिवा या म्हणीतून प्रखर राष्ट्रीयपणाचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक शूर वीर जिवाजी महाले होते.

Veer Jivaji Mahale Information In Marathi

वीर जिवाजी माहाले विषयी संपूर्ण माहिती Veer Jivaji Mahale Information In Marathi

जन्म:

प्रतापगडाच्या पायथ्याशी कोंडवली, जिल्हा सातारा येथील संकपाळ कुटुंबात वीर जिवाजिंचा जन्म 9 ऑक्टोबर 1665 रोजी झाला. आई-वडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव माहाले यांनी केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले. त्यानंतर बालपणापासून आलेल्या विविध संकटातून लढ्याच्या काळात मुलांना लढाईचे प्रशिक्षण दिले जायचे.

जिवाजी सुद्धा साताऱ्याच्या लाल मातीत मेहनत करणारा पटाइत होऊ लागला. जोर-बैठका, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे याचे शिक्षण त्याला मिळाले होते. मातीत कुस्ती खेळणे या प्रशिक्षणात तो चांगला पारंगत झाला.

जिवाजी दांडपट्टा असा फिरवायचा पायाच्या खाली ठेवलेल्या लिंबाचे डोळ्यांचे पापणी लवते न लवते तो दोन तुकडे करायचा. उंच उड्या मारण्यात तो निष्णात होता. उड्या मारल्यावर हवेतच शत्रूचा शरिराचे दोन तुकडे करत असे. शिवाय त्याची तीक्ष्ण नजर होती, जिवाजी माहाले यांचे मुळगाव कोंडवली बुद्रुक हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे.

महाबळेश्वर जवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज सध्या राहत आहे. जिवा माहालाचा मोठा भाऊ हा ताना माहाले जीवा माहालेंचा मुलगा सिताराम, सितारामचा मुलगा सुभानजी, सुभानजी चे पुत्र नवरोजी व काळोजी. नवरोजीचा मुलगा हरी आणि काळोजीचा मुलगा सुभानजी आहे. जिवा महाला यांचे वडील पहिलवान होते. ते शिवाजीराजांचे वडील शहाजी यांच्या सेवेत होते.

बक्षीस :

छत्रपती शाहू राजांनी 1707 मध्ये जीवाजींच्या वंशजांना निगडे, साखर ही गावे इनाम दिली होती. त्या पत्रात जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे.

शिवरायांनी आपल्या अनेक छोट्या-छोट्या मावळ्यांच्या मदतीने प्रचंड मोठे हिंदवी स्वराज्य निर्माण केले, परंतु स्वराज्य निर्माण करताना अनेक मौल्यवान हिरे लयाला गेले. त्यांच्या या कार्यात तन-मन-धनाने या सर्वांनी सहकार्य केले. यात सर्वात महत्त्वाची भूमिका शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी माहाले यांची होती .

शरीर रचना:

शिवरायांना जेव्हा जीवा माहालेविषयी समजले. तेव्हा त्यांनी जिवाजी ला लाखोच्या सैन्यात दाखल करून घेतले. त्यांचा तरणाबांड, भरदार, पल्लेदार मिशा, नाक सरळ भलेमोठे कपाळ आणि भेदक नजर पाहताच शत्रूही थरथर कापत होते. शरीराने वाघ-सिंह ज्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी धावतात, त्याचप्रमाणे ते अतिशय चपळ होता.

शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी विजापूरच्या दरबारात बडी बेगमने सर्व मातब्बर सेनापती सरदारांना बोलावले होते. तिने सर्वांना सवाल केला शिवाजीला कोण पकडून आणेल. दरबारात तर शांतता पसरली तेवढ्यात मागून एक प्रचंड देहाचा पायातील वाहना करकर आवाज दरबारात आला. त्याने बडी बेगमचे आव्हान स्वीकारले. अफजलखान निश्चित हे काम फत्ते करणार असा विश्वास तिला वाटू लागला. भल्याबुऱ्या मार्गाने किंवा विश्वासघाताने अनेक शत्रूंना संपवण्यात तो तरबेज होता.

प्रतापगडाच्या पायथ्या जवळची ऐतिहासिक भेट :

अफजलखान आपल्यासोबत हजारो सैन्य मोठं घोडदळ पायदळ घेऊन मजल दर मजल करत महाराष्ट्रात दाखल झाला होता. तेव्हा शिवराय रायगडावर होते. रायगड सोडून शिवरायांनी प्रतापगडावर जाण्याचा विचार केला कारण प्रतापगड सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय योग्य किल्ला होता. शिवाय डोंगरी किल्ला असल्याने एकावेळी एकच व्यक्ती येथे जाऊ शकत होता.

आजूबाजूचा परिसर संपूर्ण जंगलाने वेढलेला होता. त्यात हिंस्त्र पशू प्राणी जंगली श्वापदांचा वावर असल्याने प्रतापगड वर जाणे खूपच अवघड होते. शिवाय शिवराय प्रतापगडावर पोहोचल्याचे वृत्त बद्दल समजताच अफजल खान खूप चिडला. त्याने हिंदू देवदेवतांची मंदिर पाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे तर शिवाजीराजे खाली येतील असा त्यांचा डाव होता.

शिवरायांनाही माहीत होत. ते पाहून त्यांना सेवका मार्फत शिवाजी यांना भेटण्याचा निरोप पाठविला. तुम्ही माझ्या मुलासारखे मलाही भेटण्यास या आमचे किल्ले परत द्या. मी तुम्हाला बादशहाकडून जाहीर बक्षीस देतो. शिवरायांनी टोला मारला, ‘मला तुम्हाला भेटण्याची भीती वाटते, तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी या ‘ असे म्हणताच अब्जल खान खुश झाला.

भेटीची तारीख आणि वेळ ठरली महाराजांनी सगळ्यांना कामे वाटून दिली. जिवा तुम्ही सय्यद बंडावर नजर ठेवायची असे सांगून त्यांना सोबत घेतले भेटीचा दिवस उजाडला प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर शामियाना उभारण्यात आला होता. अफजल खानचे मनोराज्य चालू होते. महाराज गडाच्या पायऱ्या उतरत असताना, थोड्या अंतरावर सय्यद बंडा उभा होता.

जीवांनी सय्यद बंडा विषयीची माहिती महाराजांना दिली. त्याला तेथून दूर करण्यास सांगितले. महाराजांनी वकिलामार्फत निरोप पाठवून सय्यद बंडास दूर करण्यास सांगितले. अफजलखान त्यांचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शामियान्यात होते. अफझलखानने शिवरायांना दोन्ही हात हवेत पसरून आलिंगन दिले.

त्यांची मान डाव्या कुशीत दाबून ठेवली आणि उजव्या हाताने कट्यार पाठीवर केला अंगात चिखलत असल्याने कट्यार घसरत गेली. शिवरायांनी क्षणाचाही विलंब न लावता.सदर्यात लपवलेला बिचवा काढून खानाच्या पोटात खुपसला शिवरायांवर त्यांच्या वकिलांनी हल्ला चढविला.

शिवाजीराजांनी कृष्णाजी कुलकर्णी यांचे ही तलवारीने दोन तुकडे केले. सय्यद बंडा गोंधळाचा आवाज ऐकून धावत आला. महाराजांवर हल्ला करणार इतक्यात जीवा माहालेने सय्यद बंडाचा समशेर असलेला हात वरच्यावर हवेत कापला. शिवरायांनी या लढवैयाचे कौतुक वाटले व तेव्हापासून ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण आजही प्रचलित आहे.

जीवा महाला समाधी:

जीवा माहाले यांची समाधी राजेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी अंबावडे गावात वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाजवळ आहे.जीवा माहाले यांनी शिवाजी महाराजांचे प्राण वाचवलेची ही घटना तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी घडलेली आहे. परंतु ती आजही अजरामर आहे.

अशा तऱ्हेने इतिहासाच्या पानांमध्ये प्रतापगड येथील अपघात अफजल खानाची आणि शिवरायांची भेट अजरामर झाली. त्याचप्रमाणे या लढाईत जिवा माहाला यांचे शौर्य देखील सर्वांच्या लक्षात व कायमचे कोरले गेलेले आहेत.

“तुम्हाला आमची माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.”

हे सुद्धा अवश्य वाचा :-

कोण आहेत जिवाजी महाले?

 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा सैन्यातील प्रमुख लष्करी नेते आणि कमांडर होते. 

Leave a Comment