Manvi Jeevnaat Vicharanche Mahattwa Marathi Nibandh मानवी जीवनामध्ये विचारांना खूप अनन्यसाधारण स्थान आहे. विचारांच्या जोरावर मनुष्य जीवनात कुठली असते गोष्ट साध्य करू शकतो. चांगले विचार हे व्यक्तीला जीवनात नक्कीच यशस्वी करतात.
मानवी जीवनात विचारांचे महत्व मराठी निबंध Manvi Jeevnaat Vicharanche Mahattwa Marathi Nibandh
आपल्या मानवामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे विचार करण्याची क्षमता होय. म्हणुनच मनुष्याला सर्वात बुद्धिमान प्राणी असेसुद्धा म्हणतात. कारण इतर प्राण्यांना चांगले वाईट गोष्टीचे विचार करण्याची क्षमता नसते परंतु ही क्षमता देवाने दिलेली मनुष्याला एक देणगीच आहे. ज्यासाठी आपण देवाला नेहमी आभार मानतो आणि पुढेही देवाचे आभार असेल.
आपणास माहिती आहे की विचार करण्याच्या देखील बरेच मार्ग आहेस आपण ज्या गोष्टीचा विचार करतो त्यानुसार वागतो. एखाद्या व्यक्ती चांगले विचार करत असेल तर त्याचे व्यक्तिमत्त्व सांगा चांगलेच घडते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये विचारांना खूप महत्त्वाचे स्थान आहे.
विचार हे सामान्यता चांगली विचार सारणी, वाईट विचार, सकारात्मक विचार किंवा नकारात्मक विचार असतात.
परंतु यापैकी आपण कुठल्या प्रकारचा विचार करतो यावर आपले पुढचे जीवन अवलंबून असते. त्यामुळे आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, चांगली किंवा सकारात्मक विचार सारणी ही लोकसंख्येच्या केवळ काही टक्केच आढळून येते. त्यामुळे आपल्या समाजामध्ये चांगल्या व्यक्तिमत्वाचे लोके खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात.
केवळ विचारच मनुष्याला देव तेव्हा राक्षस बनवू शकतात. आपल्या इतिहासामध्ये डोकावून पाहिले असता आपल्याला विचारांचे महत्त्व कळून येईल. आपल्या इतिहासामध्ये अनेक महान पुरुष होऊन गेले ज्यांनी लोककल्याणासाठी, समाजसेवेसाठी आणि आपल्या देशासाठी स्वतःचे प्राण सुद्धा गमावले. थोडक्यात इतिहासातील सर्व महापुरुषांचे विचार चांगले व सकारात्मक होते म्हणून आज देखील त्यांचे नाव अमर आहे व त्यांच्या मुर्त्या समोर आपण वंदन करतो.
आपण आयुष्यात किती यशस्वी होतो किंवा आपण ठरवलेले एखादे साध्य करू शकतो की नाही हे पूर्णपणे आपल्या विचारांवर अवलंबून असते. वास्तविक सांगायचे एवढेच की, आपली विचार सारणी हे आपले वास्तविक व्यक्तिमत्व आणि वर्तन आहे जे शारीरिक स्वरूपात प्रकट होते.
आपण जसे विचार करतो त्याप्रमाणे आपली वागणूक असते आणि त्याच प्रकारे आपण लोकांच्या समोर येतो. यावरूनच समाज आपल्याला कितपत आदर किंवा सन्मान द्यायचा हे ठरवितो. आपण काय बोलतो, आपण काय बोलतो आणि आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतो व त्याच्या काय प्रतिक्रिया येतात हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
खरंतर! आपली विचारसरणी ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब दर्शवते.
विचारांचे प्रकार:
सर्वसाधारणतः आपण काय विचार करतो यावर विचाराचे प्रकार अवलंबून आहेत. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा चांगला विचार करीत असेल तर त्याला सकारात्मक विचार म्हणतात. याउलट एखाद्या गोष्टीचा आपण वाईट विचार करत असेल तर त्याला नकारात्मक विचार म्हणतात. म्हणूनच विचारांचे दोन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे-
१. सकारात्मक विचार:
प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक विचार असणे खूप गरजेचे आहे. आपली सकारात्मक विचार सारणी ही एक विश्वास आहे की, आपण जीवनात अगदी कठीण परिस्थिती ही सोडवू शकतो.सकारात्मक विचार धारणेच्या जोरावर आपण जीवनात आलेल्या सर्व समस्यांना साहसाने तोंड देऊ शकतो.
अगदी कठीण काळातही धैर्य राखणे ही आपल्या सकारात्मक विचार सारणीची शक्ती आहे. केवळ आपल्या सकारात्मक विचार सारणी मुळेच कोणतेही कठीण कार्य करण्याचे धैर्य आपल्याला प्राप्त होते. कोणतेही कार्य आपण जितके सकारात्मकपणे करतो तितके कार्य अचूक आणि यशस्वी होते.
जीवनाच्या कठीण परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार न बाळगण्यामुळे अनेक लोक आपले नुकसान करून घेतात. आज पर्यंतच्या सर्व यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचे रहस्य म्हणजे सकारात्मक विचार हेच आहे. सकारात्मकता ही आपल्या यशाची गुरुकिल्ली आहेच त्यासोबत आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायद्याचे ठरते.
२. नकारात्मक विचार:
नकारात्मक विचार म्हणजे एखाद्या गोष्टीचा वाईट विचार करणे किंवा एखादी गोष्ट साध्य करण्या अगोदर “ती गोष्ट माझ्याकडून होणार नाही” असा समज बाळगणे होय.
नकारात्मक विचार असणाऱ्या लोकां द्वारे केलेले कार्य खराब होऊ लागते आणि नकारात्मक विचारसरणीचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. नकारात्मक विचार हे आपल्याला अपयशाच्या तळापाशी आणून ठेवतात. तसेच नकारात्मक विचार आपल्याला समाजामध्ये हरण्याचे उदाहरण देखील बनवते. जीवनातील अडचणींना धाडसाने तोंड न देता हाताशी येऊन बसणे हे नकारात्मक विचारांचे लक्षण आहे.
एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न न करता यश मिळणार नाही अशा वाईट कृत्यांचा निकाल लावणे हे नकारात्मक विचार धारणेचे उदाहरण आहे.
अशा प्रकारे मानवी जीवनात विचारांना महत्त्वाचे स्थान आहे.आपण कुठल्या प्रकारचा विचार करतो यावर आपले जीवन घडत असते. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार बाळगणे फायद्याची ठरते.