Gautam Buddha Quotes In Marathi जगातील धर्मसुधारक आणि विचारवंतांमध्ये सामील असलेले महात्मा बुद्ध हे बौद्ध धर्माचे प्रचारक होते. भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला ज्ञान, विवेक आणि सत्याचा मार्ग दाखवला. आज चीन, भारत, जपान आणि श्रीलंका समवेत दहापेक्षा जास्त देशांमध्ये भगवान बुद्धांची पूजा केली जाते. येवढेच नव्हे तर बौद्ध धर्माचे अनुयायी भगवान बुद्धांची शिकवण जगभरात पोचवण्यासाठी कार्य करीत आहेत.
भगवान गौतम बुद्धांचे महान विचार Gautam Buddha Quotes In Marathi
आजच्या या लेखात आपण भगवान बुद्धांचे काही अनमोल सुविचार पाहणार आहोत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या ह्या प्रेरणादायी सुविचारांमधून आपणास खूप काही शिकण्यास मिळेल.
मन शांत केल्यावर सर्व समस्यांचे समाधान सापडते.
ज्याने आपल्या मनाला नियंत्रणात केले, त्याच्या विजयाला परमेश्वर देखील अपयशात बदलू शकत नाही.
सर्व वाईट कार्य मनामुळेच होतात. जर मन परिवर्तित झाले तर वाईट कार्य देखील थांबतील.
एक निष्ठाहिन आणि वाईट मित्र जंगली प्राण्यापेक्षा जास्त भयानक असतो; कारण एक जंगली प्राणी फक्त शरीराला घाव देतो परंतु एक वाईट मित्र तुमच्या मनाला आणि बुद्धीला घाव घालतो.
चातुर्याने जगणार्या लोकांना मृत्यूलाही घाबरण्याची आवश्यकता नाही.
द्वेष हा द्वेष केल्याने कमी होत नाही, परंतु प्रेम केल्याने नक्कीच कमी होतो. आणि हेच शाश्वत सत्य आहे.
ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण प्रवास व्यवस्थित करणे आहे.
तुम्हास आपल्या क्रोधासाठी दंड मिळणार नाही तर तुमचा क्रोधच तुम्हाला दंड देईल.
हजारो शब्दांपेक्षा तो एक शब्द चांगला आहे जो शांती निर्माण करतो.
पाण्याचा जग हा थेंब थेंब पाण्यानेच भरतो.
भूतकाळाकडे लक्ष देऊ नका, भविष्याचा विचार करू नका, आजच्या वर्तमानात चित्त केंद्रित करा.
आरोग्य ही सर्वात मोठे बक्षीस आहे, संतोष सर्वात मोठे धन आहे आणि प्रामाणिकता सर्वात मोठा संबंध आहे.
ज्या पद्धतीने मेणबत्ती आगीशिवाय जळत नाही, त्याच पद्धतीने मनुष्य अध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही.
तीन गोष्टी जास्त वेळ लपून राहत नाहीत. सूर्य, चंद्र आणि सत्य.
आपल्या मोक्षप्राप्तीसाठी स्वतः प्रयत्न करा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.
जीवनात सर्वात मोठी विफलता असत्यवादी असणे ही आहे.
आकाशात पूर्व आणि पश्चिम मध्ये काहीही भेदभाव नाही. लोक स्वतः आपल्या मनात भेदभाव निर्माण करतात आणि हेच सत्य आहे असे समजू लागतात.
शांती ही व्यक्तीच्या आत असते तिला बाहेर शोधण्याचा प्रयत्न करू नका.
आनंदाचा कोणताही मार्ग नाही, नेहमी आनंदी राहणे हाच एकमेव मार्ग आहे.
मनुष्य हा जन्माने नव्हे तर कर्माने शूद्र आणि ब्राह्मण असतो.
या जगात सत्य शिवाय सर्वांचा अंत होणे ठरलेले आहे.
अज्ञानी लोकांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्याने जीवन व्यर्थ होते.
अज्ञानी मनुष्य एका बैलाप्रमाने आहे जो ज्ञानाने नव्हे तर फक्त शरीराने वाढतो.
जर आपण अंधकारात बुडलेले आहात तर आपण प्रकाशाचा शोध का नाही घेत?
वाईट गोष्टींपासून दूर राहण्याकरिता आपल्यामध्ये चांगल्या गोष्टींचा विकास करा आणि आपले मन सकारात्मक गोष्टींनी भरा.
स्वर्गाचा मार्ग आकाशात नव्हे तर आपल्या ह्रदयात आहे.
धबधबा खूप आवाज करतो. समुद्र शांत आणि खोल असतो.
ज्ञान ध्यानाद्वारे उत्पन्न होते. आणि ध्यानाशिवाय ज्ञान हरवून जाते.
तर मित्रांनो या लेखात आपण भगवान गौतम बुद्ध मराठी सुविचार व उपदेश पाहिले. आपणास हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि याशिवाय लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा वाचण्यासाठी पुढील लिंक्स पाहा.
या सणाबद्दल जरूर वाचा :
बुद्धाची प्रसिद्ध ओळ कोणती?
दु:खाचे मूळ आसक्ती आहे .
बुद्ध जगाबद्दल काय म्हणतात?
जग दुःख, मृत्यू आणि क्षय यांनी प्रभावित आहे
बौद्ध धर्माचे ब्रीदवाक्य काय आहे?
वाईट करणे थांबवणे, चांगले जोपासणे, हृदय शुद्ध करणे: ही बुद्धांची शिकवण आहे.”
बुद्ध लोकांच्या जीवनाबद्दल काय म्हणाले?
त्यांनी उपदेश केला की सर्व पुरुष, स्त्रिया आणि मुले नश्वर आहेत . आणि, सर्व नश्वरांचा मृत्यू निश्चित आहे. वास्तविक, मृत्यू आणि क्षय हे या जगातील सर्व नश्वरांचे भाग्य आहे. मृत्यू कोणालाही सोडत नाही.
जगात बौद्ध धर्माचा प्रसार कसा झाला?
भारत, आग्नेय आशिया, मध्य आशिया आणि चीन यांच्यातील ओव्हरलँड आणि सागरी मार्गांच्या नेटवर्कद्वारे बौद्ध धर्म आशियामध्ये पसरला. मध्य आशिया आणि चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आंतरसांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी चॅनेल म्हणून रेशीम मार्गांच्या विकासाशी संबंधित होता.
Thanks for sharing such wonderful stuff. Keep sharing and keep up the good work.